📍 जळगाव (प्रतिनिधी):
संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत “जुने कागद – नवी वही” हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी घरातील व शाळेतील वापरलेले जुने कागद गोळा करून त्यापासून आकर्षक व उपयुक्त वह्या तयार केल्या.
पर्यवेक्षिका शितल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कागदांची छाननी, कापणी व बांधणी करत सर्जनशीलतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला. तयार वह्यांचे शाळेत प्रदर्शन भरविण्यात आले, ज्यास सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
🌱 या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुनर्वापराची सवय रुजली असून पर्यावरण संवर्धनाबद्दलची जाणीव अधिक दृढ झाली आहे.
🎤 मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी उपक्रमाचे कौतुक करत
“कचरा नाही, संसाधन आहे” हा संदेश देत अशा उपक्रमांची पुढेही सातत्याने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र पल्स न्यूज
श्री. नवल परदेशी

Post a Comment
0 Comments